आपला जिल्हा

आदिवासींची जमीन आणि निवारा हिसकावू देणार नाही

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव एड. विश्वजित मारोतराव कोवासे यांचा इशारा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २१ फेब्रुवारी 

केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची जमीन आणि त्यांचा निवारा हिसकावण्याच्या काम करीत आहे. परंतू जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत यांच्या प्रयत्न सफल होऊ देणार नाही. असा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव एड. विश्वजित मारोतराव कोवासे यांनी दिला आहे. क्रांतीवीर बाबुराव शेडमाके गोटुल समिती पुसगुडा मक्केपल्ली चक येथे नुकताच सल्ला गागरा शक्ती अनावरण व कोया पूनेम गोंडी धर्म संमेलनाचे अयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गावात वाचनालय झाला पाहिजे हाच माझा संकल्प जेणेकरून प्रत्येक गावातील  आदिवासी युवक हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि स्वतःच्या अधिकारापासून दूर राहणार नाही हाच खरा उद्देश असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले

यावेळी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, रामदास पुंगाटी अध्यक्ष पारंपारिक ग्रामसभा इलाका घोट, जे. बी. गेडाम सल्लागार ऑल इंडिया फेडरेशन चामोर्शी, प्रभाकर येरमे, प्रशांत पोयाम अध्यक्ष, सुधाकर गेडाम सरचिटणीस, दिपक आत्राम कोषाध्यक्ष, उमेश कुमरे वालसरा, नितेश राठोड युवक काँग्रेस उपाध्यक्ष गडचिरोली , जैलाबाई कुलेटी ग्राम पंचायत सदस्य, अरुण बावणे, श्यामराव पेंदोर वाघदरा, मायाबाई मडावी गडचिरोली, अनुप हलदर, नरेश शेट्टे, कोडापे मॅडम, गौराबाई गावडे सरपंच विसापुर, जैलाबाई कुलेटी, सिताराम मंनो, फकरी नरोटे, तिम्मा सर, आणि मोठ्या संख्येने गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!