आपला जिल्हा

वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू 

वाघाच्या हल्ल्यात आरमोरी तालुक्यातील सातवा बळी 

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २९ ऑगस्ट

सरपणासाठी लाकडे आणण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता आरमोरी तालुक्याच्या शंकरनगर जंगलात घडली. बळीराम शिवराम कोलते (४७) रा. सालमारा, असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरमोरी तालुक्यात गेल्या आठ महिन्यात वाघांच्या हल्ल्यातील हा सातवा बळी आहे.

आरमोरी तालुक्याच्या सालमारा येथील बळीराम कोलते हे सरपणासाठी लाकडे आणण्यासाठी सकाळी जोगीसाखरा जवळील शंकरनगर नाल्यालगत कक्ष क्रमांक ४७ राखीव जंगलात आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत गेले होते. लाकडे जमा करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने बळीरामवर हल्ला करून त्याला ठार केले. घटनेची माहिती सहकाऱ्यांनी गावात दिली. ही माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

आरमोरी तालुक्यात गेल्या आठ महिन्यात वाघांच्या हल्ल्यात ७ लोकांचा बळी गेला. यामध्ये कुरंझा, अरसोडा, आरमोरी, इंजेवारी, बोरीचक, शिवणी बु. व सालमारा येथील इसमाचा व्याघ्रबळीमध्ये समावेश आहे. यापैकी शिवणी बु. येथील शेतकऱ्याला चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील त्याच्या शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला करून ठार केले होते. वारंवार मागणी करूनही वाघांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!