आपला जिल्हा

हत्तींचा बंदोबस्त आणि विजेच्या समस्येवर कांग्रेस चे चक्काजाम

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २३ एप्रिल 

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमध्ये रानटी हत्तींचा धुडगूस आणि वीज पुरवठ्याची समस्या शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. बहुतांश नागरिकांची उपजीविका शेतीवर अवलंबून असल्याने या प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडून मंगळवारी (दि२२) आरमोरी ते गडचिरोली महामार्गावर  भर उन्हात जवळपास एक तास चक्काजाम आंदोलन करीत सरकार आणि प्रशासनाचा निषेध करीत लक्ष वेधून घेतले.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात व आमदार रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊळगाव येथे हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी नागपूर-गडचिरोली महामार्गवरील वाहतूक १ तास रोखून धरली.

यावेळी मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्या वतीने विभागीय वनाधिकारी (दक्षता) गणेश पाटोळे यांनी याच पद्धतीची समस्या असलेल्या कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू भागात कशा पद्धतीने ही समस्या हाताळली जात आहे याचे प्रशिक्षण देणाऱ्या चमूला पाचारण करून नागरिकांची कार्यशाळा घेण्याचा उपाय सांगितला. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणामुळे वीजेची समस्या उद्भवत आहे ती लवकरच दूर करण्यात येईल असे सांगितले. ही समस्या लवकर दूर न केल्यास यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला.

यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसाचे राजेंद्र बुल्ले, कोरचीचे मनोज अग्रवाल, धानोराचे प्रशांत कोराम, गडचिरोलीचे शहराध्यक्ष सतीश विधाते, वसंत राऊत, अहेरीचे डॉ.अब्दुल निसार हकीम, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, माजी सभापती परसराम टिकले, माजी उपसभापती नितीन राऊत, जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, प्रभाकर वासेकर यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

या होत्या अन्य मागण्या 

विद्युत मीटर करिता डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना अजून पर्यंत विद्युत मीटर मिळाले नाही किंवा त्या जागी सोलर पंप सुद्धा मिळाले नाही.
 शेतकरी आणि लोकप्रतिनिधीकडून वारंवार विरोध होत असताना सुद्धा शासनाने विमानतळाकरीता पुलखलं परिसरातील सुपीक शेत जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे ते त्वरित थांबवावे व शेतकऱ्यांशी चर्चा करावी.
 चामोर्शी भेंडाळा परिसरातील एमआयडीसी करिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या शेतजमिनीचे दर वाढवून देण्यात यावे व शेतकऱ्यांशी चर्चा करूनच जमीन अधिग्रहित करण्यात यावे.
जिल्ह्यात शासकीय धान खरेदी विक्री केंद्रावर व राईस मिल मध्ये वारंवार धान घोटाळ्याचे प्रकरण उघड केस येत आहे त्यामुळे ह्या दान घोटाळ्यावर आळा घालण्याकरिता उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करून दोशींवर कडक कारवाई करण्यात यावी.
धानाला बोनस जाहीर करण्यात यावा.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. घरकुल करिता रेती उपलब्ध करून देण्यात यावे. मनरेगा अंतर्गत प्रलंबित असलेले थकीत पैसे त्वरित देण्यात यावे. जिल्ह्यातील प्रलंबित असलेले राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्याचे काम मान्सून पूर्व तातडीने पूर्ण करावे.जिल्ह्यातील विविध विभागात अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांची कामे खोडंबतात त्यामुळे रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावे.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!