ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१३ नरबळी घेणाऱ्या सीटी १ वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

वनविभागाचे मागील ८ दिवसापासूनचे अथक परिश्रम फळाला जेरबंद वाघाला गोरेवाडा येथे पाठविण्यात येणार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क | गडचिरोली, दि. १३ आक्टोंबर

वडसा वनविभागातील वडसा वनपरीक्षेत्राअंतर्गत वावरत असलेला आणि मानवी जिवीतास धोकादायक
ठरलेला नर बाघ सी टी१ या नरभक्षी वाघाला देसाईगंज लगत वळुमाता प्रक्षेत्रात जेरबंद करण्यात वनविभागाला यश प्राप्त झाले आहे.
पर्यावरण व वन मंत्रालयाचे मार्गदर्शक सुचनेनुसार सदर वाघाला बेशुध्द करुन बंदीस्त करण्यास ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेच्या आत जेरबंद केले आहे.

सीटी १ (नर) वाघामुळे वडसा वनविभागात ६, भंडारा वनविभागात ४, व ब्रम्हपुरी वनविभागात ३ असे एकुण १३ मानवी बळी घेतले होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांचे बैठकीत सीटी १ वाघास जेरबंद करण्यास सुचना देण्यात आल्या होत्या.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना समन्वयकाची जबादारी देवून युध्द पातळीवर प्रयत्न सुरू केले होते. ताडोबा व्याघ्र शिघ्र बचाव दल, आर आर टी चंद्रपूर, नवेगाव नागझीरा व्याघ्र शिघ्र बचाव दल आर आर टी, आणि अमरावती प्रादेशिक शिघ्र बचाव दल आर आर टी वाघाला पकडण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करीत होते. बुधवार दिनांक १२.१०.२०२२ रोजी देसाइगंज लगत वळुमाता प्रक्षेत्रात या वाघाने गाईला ठार केले होते. त्याशिकारी जवळच वनविभागाच्या चमुने दुसरे बेट (सावज) बांधून सदर वाघास आकर्षित केले. आणि रात्रभर वाघावर बंकर केज मध्ये बसून पाळत ठेवली. गुरुवारी सकाळी हा वाघ मारलेल्या शिकारीजवळ आला तेव्हा बंकर केज मध्ये तैनात डॉ. आर. एस. खोब्रागडे, पशुवैद्यकिय अधिकारी वन्यजीव तथा आर आर टी प्रमुख, ए. सी. मराठे, पोलिस नाईक (शॉर्पशूटर), राकेश अहुजा, बॉयोलाजीस्ट व त्यांच्या इतर टिम सदस्यांनी तात्काळ बंदुकीतून डॉर्ट मारून वाघाला बेशुध्द केले व वडसा वनविभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी वाघ शुध्दीवर येण्यापुर्वी कोणतीही इजा न होता पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच गडचिरोलीचे वनसंरक्षक यांनी भेट देवून जेरबंद वाघाला गोरेवाडा येथे पाठविण्याबाबत वरिष्ठाचे मार्गदर्शन घेतले. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
सी टी १ वाघाने डिसेंबर २०२१ पासून आतापर्यंत एकुण १३ लोकांचा बळी घेतल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये या वाघाबद्दल रोष निर्माण झाला होता. लोकप्रतिनिधी व्दारे त्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत होती. क्षेत्रीय स्तरावर गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, वडसा उपवनसंरक्षक श्री. धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक वनसंरक्षक श्री. मनोज चव्हाण, श्री. धनंजय वायभासे, अविनाश मेश्राम, विजय धांडे, व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी मागील ८ दिवसापासून अथक परिश्रम घेवून १३ नरबळी घेणाऱ्या सीटी १ वाघाला जेरबंद करण्यात यश मिळविलेले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!