क्राईम स्टोरीताज्या घडामोडी

पोलीस आणि नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १ मे 

भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम आणि पेरमिली पोलीस मदत केंद्रादरम्यान येत असलेल्या केळमारा जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात रविवारी रात्री झालेल्या चकमकीत नक्षल्यांच्या पेरमीली दलम कमांडर  बिटलू मडावी याचेसह तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांच्या नक्षल विरोधी अभियान पथक  सी-६० ला मोठे यश आले आहे.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री आज गडचिरोलीत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी १२ वाजता गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते सायंकाळ पर्यंत जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. ते  रात्रीच्या चकमकीत यश संपादन करणाऱ्या पथकाचे अभिनंदन करणार आहेत.

 

पोलीसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी सायंकाळी सहा  च्या सुमारास गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी  पथकाने भामरागड तालुक्यातील केळमारा जंगल परिसरात अभियान राबवले होते. दरम्यान आपल्या दिशेने येत असलेल्या पोलीस पथकाची चाहूल लागताच नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ३ नक्षलवादी ठार झाले. यामध्ये पेरमीली दलम कमांडर  बिटलू मडावी याच्यासह विभागीय कमांडर वासू आणि अहेरी दलम सदस्य श्रीकांत ठार झाला. काही दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मर्दहूर येथील साईनाथ नरोटे हत्याप्रकरणात बिटलू मुख्य आरोपी होता. तर वासू याची नुकतीच डीव्हीसी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मर्दिनटोला चकमकीनंतर एकाच चकमकीत एकापेक्षा अधिक नक्षलवादी ठार करण्यात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!