आपला जिल्हाक्राईम स्टोरी

दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांनी केली तरुणाची गोळ्या घालून हत्या

नक्षलवाद्यांची पुन्हा एकदा गडचिरोलीत दहशत ; महिण्यात तिसरी घटना

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २५ नोव्हेंबर 

पोलीसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी आणखी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रामजी आत्राम वय २७, रा. कापेवंचा ता. अहेरी. असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून घटनास्थळी आढळलेल्या नक्षल पत्रकात तो पोलीस खबऱ्या असल्याचा दावा केला आहे. ही या महिनाभरातील तिसरी नक्षलवाद्यांनी केलेली हत्या आहे.  

दक्षिण गडचिरोली भागात महिनाभरात नक्षलवाद्यांनी तिघांची हत्या केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. उल्लेखनीय आहे की मुख्यमंत्री दिवाळीनिमित्त गडचिरोलीत असताना नक्षलवाद्यांनी पहीली हत्या केली. तर ऊद्योग मंत्री उदय सामंत शुक्रवारी गडचिरोलीत असतानाच्या पूर्वसंध्येला आणि परत गेलेल्या रात्री नक्षलवाद्यांनी तीन निरपराध नागरिकांचे बळी घेतले आहेत. दोन्ही मंत्र्यांनी नक्षलवाद गडचिरोलीतून हद्दपार झाला असल्याच्या ‘बाता’ केल्या. उद्योग मंत्र्यांनी तर उद्योजकांच्या बैठकीत सांगितले की आपल्या फायद्यासाठी गडचिरोली जिल्ह्याला आता नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, मागास ही दुषणं लावून प्रतिमा डागाळू नका.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, २४ नोव्हेंबर नंॲअरोजी अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कापेवंचा येथील रहिवासी असलेला रामजी हा तरुण आपल्या शेतात काम करीत होता. दरम्यान, संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास काही सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्याठिकाणी जाऊन गोळ्या झाडून त्याची हत्या केली.

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी रामजीची हत्या केल्याचा दावा नक्षल्यांनी घटनास्थळी टाकलेल्यापत्रकात केला आहे. मात्र, तो खबरी नव्हता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून तपासानंतर अधिक बाबी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले आहे. महिनाभरात दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांनी तिघांची हत्या केली आहे. १५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे, २३ तारखेला एटापल्ली तालुक्यातील टिटोडा येथील पोलीस पाटील लालसू वेडदा आणि शुक्रवारी अहेरी तालुक्यातील कापेवंचा येथील रामजी आत्राम या तरुणाची हत्या केली. तोडगट्टा येथील खाणविरोधी आंदोलन प्रशानाकडून उधळून लावण्यात आल्यानंतर नक्षलवादी अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मागील दोन वर्षांपासून शांत बसलेले नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र असून लागोपाठ घडवून आणलेल्या हत्यासत्राने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!